Sunday, May 22, 2016

#selfimage



Twitter handle सारखं सेल्फ इमेज handle असते ज्याच्या सहाय्याने आपण आयुष्याच्या गर्दीतून वाट काढतो. आणि तेच handle इतर लोकं आपल्याला manipulate करायला वापरू शकतात. 

आपली सेल्फ इमेज आपण तयार करत असतो - ‘मी अस कधीच वागत नाही,’  ‘मी नेहमीच टापटीप असतो,’ ‘मला अन्न टाकलेलं चालत नाही,’ ‘संकटात असलेल्या माणसाला मदत केल्याशिवाय मी स्वस्थ बसू शकत नाही’ अशा तऱ्हेने.

लोकांना आपल्यात जे गुण दिसतात त्याचं ते कौतुक करतात. हळूहळू हे कौतुक मिळाव म्हणून आपण तसं वागत जातो आणि मग तो सवयीचा भाग बनतो. अशा तऱ्हेने तीच आपली ओळख होऊन बसते. शेवटी आपण या सेल्फ इमेजची शिकार बनून जातो. कित्येक वेळा सेल्फ इमेज प्रमाणे वागण सोयीचे नसले तरीही अट्टाहासाने तसच वागतो. आणि काही अडथळे आलेच तर आपण स्वतःला त्रास करून घेउनही सेल्फ इमेज ला साजेसच वागतो. 

एक साधं उदाहरण बघू. आमच्या नात्यातल्या एक बाई अत्यंत हलाखीत लहानपण गेलेलं. काटकसरीत जीवन गेलेलं. मुल मोठी झाली. आता सुबत्ता आहे. ‘मी अन्न वाया घालवत नाही.’ ही खोल रुजलेली value. आता वय ७५, गुडघेदुखी सुरु झालेली. तिसऱ्या मजल्यावर घर, बिल्डींग मध्ये लिफ्ट नाही. ....... घरी मुलाने लसून शेव आणली, पण फारशी कुणाला आवडली नाही त्यामुळे सहा महिने पडून राहिली, खराब वास यायला लागला, कोणी खाण शक्य नव्ह्त. सर्वानुमते शेव आता टाकून देऊ अस ठरलं. बाई शेव घेऊन खाली निघाल्या. मुलगा म्हणाला अग कुठे निघालीस, पाय दुखतोय ना? तर त्या म्हणाल्या, अरे शेव टाकून येते कचरापेटीत. अग पण केरवाला येईल ना उद्या, केरात टाक ना .. साधा सरळ सल्ला. बाई म्हणाल्या केरवाला बडबड करेल. तो नेहमी म्हणत असतो लोक किती वाया घालवतात, टाकून देतात. नको मी आपली टाकून येते कचरापेटीत. सर्वांनी समजावून सांगूनही बाई खाली उतरून कचरापेटीत शेव टाकून आल्या.

केरवाल्या माणसाच्या approval वर आपण जीवन जगतो का असा विचार माझ्या मनात सारखा रेंगाळत राहिला. मग लक्षात आल कि खरतर नाही. आपल्या मनानी सोसायटी च्या values internalize केल्या आहेत ते मनच केरवाल्याचा हवाला देऊन आपल्याला आपल्या सेल्फ इमेज पेक्षा वेगळ वागून देत नाही.

आपल्यालाही असे काही अनुभव share करायचेत का ?

Tuesday, May 17, 2016

Collective Procrastination

आपण बऱ्याचवेळा, सहज साध्य होणारी गोष्ट क्लिष्ट करून ठेवतो का ? उल्टा घास घेतो का ?  असा प्रश्न मला नेहमी पडतो. सगळ नीट माहित असूनही action घ्यायला वेळ आपण लावतो किंवा बुद्धीनी इतके श्लेष काढतो की विचारानीच आपण impossibility create करतो ..  हे मला नेहमीच जाणवलय, वैयक्तिक जीवनातही आणि सामाजिक जीवनात तर फारच जास्त.

काम करताना मी जे अनेक initiative  घेतले. ते अगदी योग्य,  नेमके आणि घडायलाच हवेत असे होते, शिवाय पूर्ण working  केलेले,  सर्वांना सकृतदर्शनी  मान्य असलेले असे होते; तरीही प्रत्यक्षात यायला खूप वेळ लागायचा. त्यामुळे माझी फार चिडचिड व्हायची. कुठे घोडं पेंड खातंय तेच कळायचं नाही.

हळूहळू माझ्या अस लक्षात आल कि मी पण असच करते. अगदी मी ठरवलेली गोष्टही; सर्व परिस्थिती अनुकूल असूनही मी लगेच हातात घेते अस होत नाही. यालाच procrastination म्हणतात. मी कित्येक वेळा माझ्याच कामाला फाटे फोडते.

एक अगदी साध उदाहरण घेऊ. कपाट आवरायचं आहे, आज मला वेळ आहे, दुसर कोणीही हे आवरणार नाही, कपाट नीट लावलेले नसल्यामुळे रोज माझा गोंधळ होतोय Now this is the opportune time  असे असतानाही मी पूर्णपणे तयार असूनही प्रत्यक्ष कपाट आवरायची कृती होईलच असे नाही.

मग मी वेळोवेळी ‘कपाट आवरायला हवंय’ अस स्वःताशीच पुटपुटते ... म्हणजे ‘कुणी’ आवरायला हवंय ? अस कुचकटपणे विचारणारा तुकारामांचा निंदक शेजारी माझ्या सोबत त्यावेळी असेलच असे नाही. मग मी कशी well meaning आहे. खरतर मला आवरायचं होत असा आव आणून, स्वःतला दुसऱ्याच activity मध्ये अडकवून घेते.

अशातऱ्हेने आपण सर्वच जण गोष्टी लांबवत जातो. procrastinate करतो.
सरकारी कार्यालयात file process करताना काढल्या जाणाऱ्या queries  या नेहमीच genuine असतात अस नाही पण त्या दुष्टपणाने काढलेल्या असतात असेही नाही. आत्ता नको ना, मग बघूया मानसिक अवस्थेतूनही अशा कृती घडत असणार .. अगदी विनाकारण... अस आता मला वाटू लागलंय.

समाज म्हणूनही आपण collective procrastination  करतो असे मला वाटते. म्हणूनच स्त्री शिक्षण आवश्यक आहे हे सांगून, सिद्ध होऊनही; प्रत्यक्ष सर्वांनी मान्य करून त्यावर अंमल व्हायला वर्षामागून वर्ष लोटतात. किंवा एकूणच कोणताही वेगळा, पण योग्य विचार स्वीकारून अंगीकारायला समाज फार वेळ लावतो हे इतिहासानी आपल्याला दाखवलंय.

मी जनवाणी या संस्थेत काम करत असताना स्वच्छतेवरचा फुलप्रूफ उपाय प्रत्यक्षात आणूनही तो अंगीकारावा अस महानगरपालिका / नगरपालिकांना वाटत नाही. इतर काही नागरापालीकानीही similar प्रयोग केलेत. कारण तोच एक logical  मार्ग आत्ताच्या परिस्थितीत योग्य आहे. अशा परिस्थितीत कचऱ्याचा प्रश्न भीषण होत असूनही, हे सिध्द झालेले उपाय rampant होताना दिसत नाहीत. याचं कारण काय तर collective procrastination; योग्य गोष्टीच्या acceptance साठी समाज आपला natural वेळ घेत असतो, हे मी हताशपणे पाहत आहे.


या blog ला जोडून ‘सत्याला पण lobbying करावे लागते का?’ हा blog लिहायचा विचार करतीय. 

Wednesday, May 4, 2016

कम्युनिकेशन ची गर्दी - धक्का लागणारच


A curious mix of democracy, globalization and digitization has shattered our secure and serene lives. The whole society is becoming reactive. The high values like empathy, सहिष्णुता, respecting others' opinions, live and let live approach ; are out of style now.

जगाच्या या गर्दीत मी सारख्या टाचा उंचावून 'hey, I am there' असं सांगितलं नाही तर माझ्या इगो च्या survival चा प्रश्न, जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो.  कोणत्याही प्रश्नावर मी माझे मत, उसनवारी केलेले का असेना, मांडलेच पाहिजे; हे आजकाल TV वरच्या तावातावाने चाललेल्या चर्चाWatsapp  वर व्यक्त होणारा अभिनिवेश पहिला कि लक्षात येते. माझा आवाज ऐकला जावा या हट्टापायी आपल्या संवादाची पट्टी shrill होत चाललीय.

केवळ असे वादी/प्रतिवादी मेसेज Watsapp  ग्रुप्स मधून फिरताना पहिले तरी रक्तदाब वाढतो. तुम्ही मत व्यक्त नाही केल तरी, तुमच्या मताला आपसूकच कोणीतरी थप्पड लगावलेली असते. समुद्राच्या लाटांमध्ये तुम्ही शांत उभे राहिलात तरी तुम्हाला मुळापासून उखडून टाकण्याची ताकद असते ना .. तसच होतंय काहीतरी. We are becoming part of blame game.  I feel this is certainly not a healthy sign.

Digitization  मुळे आधीच असलेली माणसांची गर्दी शतपटीने वाढवून संवादाचा इतका कोलाहल झाला आहे कि तुम्ही नुस्त उभंराहायचं ठरवलं तरी तुम्हाला धक्का लागणारच...


किमान एखाद्या घटनेचे भयंकरीकरण करणारे मेसेजेस आपापल्या वैयक्तिक पातळीवर ignore करून विसर्जित करता येतील का ?