Wednesday, September 28, 2016

ताजी माणस शिळी माणस

माझ्या मागच्या blogpost वर growth म्हणजे नेमक काय? याबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले. मीही त्या पश्नांमुळे त्याबाबत नीट  विचार करू लागले, आणि सगळ्यानांच हि चर्चा वाचता यावी म्हणून separate post च टाकायची ठरवली. 

watsapp मुळे जुन्या मैत्रिणींचा परत संपर्क झाला, सुमा भेटली आणि मी हरखूनच गेले. तिने आयुष्य ज्या सहजतेने आणि आनंदाने पेलालेय ते पाहून आतून आनंद झाला. लौकिक अर्थानी तिने जीवनात फार काही विशेष मिळवलं होत अस नक्की नाही, कौटुंबिक पातळीवरही विशेष उल्लेखनीय काही नाही. पण तरीही तिला भेटून फार छान वाटत होत. काहीतरी साध्य केल होत तिने, जे शब्दात पकडण अवघड होत. पण एक चिरंतन आनंद जो कोणत्याही परिस्थितीत सुकणार नाही अस काहीतरी वाटल तिला पाहून.

जीवन प्रवाही आहे तुम्ही थांबून राहिलात तर साचलेपण येत. माझी मैत्रीण सुमा, growth चा उत्तम नमुना आहे अस मला वाटत. याचा अर्थ आनंदी माणूस हा growth झाल्याचे परिमाण आहे का, तर अगदी तसेही नाही. आणखी एक मैत्रीण भेटली ती खूप कुरकुर करत होती, तक्रारी सांगत होती आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न हि करत होती. तिला भेटूनही छान वाटले, ती आनंदी नव्हती तरीही. कारण तिच्या तक्रारी या पूर्वीपेक्षा वेगळ्या आणि वरच्या maturity level च्या होत्या. आयुष्यात सुख दुखे येणारच आहेत पण आपण एखाद्या destination ला किती वेळ थांबतो जुन्या सुखात आणि दुखात किती गुंतून राहतो हा कळीचा मुद्दा आहे 

त्यामुळे मला असेही लक्षात आले कि अगदी एखादा आनंदी, विनोदी मित्र हि काही दिवसांनी कंटाळवाणा वाटू शकतो, जर तो आयुष्याकडून शिकून पुढे वाटचाल करत  नसेल तर. 

growth चा मला कळलेला अर्थ unleashing the potential हा आहे. रोज अनुभवातून काहीतरी शिकायचं, निरुपयोगी गोष्टी विसरायच्या (unlearning), आपल पात्र थोड थोड मोकळ करायचं, स्वतःला खूल करत जायचं, मनाची कवाड उघडायची, स्वतःच्या विचारावर बसलेली पुट काढायची, मनातील गाठी सोडवायच्या, सत्याची एक एक पाकळी उमलत जाण्याचा आनंद घ्यायचा.

आपणच आखलेल्या, सवयीने जडलेल्या, समाजाने घालून दिलेल्या, परिस्थितीने निश्चित केलेल्या लक्ष्मण रेषांचे बदलते स्वरूप समजून घ्यायचे आणि त्या बंधनातून किमान विचारांच्या स्तरावर तरी मुक्त व्हायचे. आपण कोणत्या तरी भीतीमुळे एखाद्या विचाराला चिकटून बसलोय का हे नितळपणे पाहायला शिकायचे.

Growth म्हणजे आपण जे given  म्हणून घेऊन निघालो आहोत ते तपासता येण. मेणबत्तीने चटका बसल्यावर 'मेणबत्ती म्हणजे फक्त चटकाच' असा परिस्थितीचा बाऊ न करता इतर शक्यतांना open राहण.

आजच्या जगात जेंव्हा सगळ्याच बदलांचा speed वाढला आहे तेंव्हा माणसाचा growth rate also matters.  लौकिकअर्थाने  growth  होताना सुद्धा माणूस म्हणून विकास होतो by default काहीवेळेला पण त्याची खात्री नसते.  लौकिक अर्थाने सर्व आलबेल असलेल्या व्यक्तीला जेंव्हा आयुष्यात स्थिर वाटत नाही, शांतता लाभत नाही तेंव्हा growth as person, not as a role  कशी महत्वाची आहे हे उमगायला लागत.
त्यामुळे आयुष्याच्या प्रवाहाशी आपले सूर जितके जुळतील, जितके कमीतकमी  resist होऊन सहज जुळतील, तेवढे आपण प्रफुल्लीत, आत्ताच उमलल्यासारखे राहू. जर का थांबलो, स्वतःची growth resist  करत राहिलो, तर साचलेपणा येईल.शिळे होऊन जाऊ.


Monday, September 12, 2016

Self talk च पालुपद



आपला कायम स्वतःशी संवाद चालू असतो. या संवादाच एक ‘धृपद’ असत अस मला वाटत. म्हणजे वाद प्रतिवाद करत करत एका निष्कर्षापाशी येऊन पोहोचतो. आणि तिथे आल्यावर आपली खात्री पटते कि याउपर काही होणे नाही. परत विचारचक्र चालू होत. पण फिरून फिरून आपण त्याच समेवर येतो. आणि नेमक हेच धृपद आपली growth थांबवत अस आता मला वाटू लागलय. 

आपलं धृपद आपल्यालाच सापडण अवघड असते. पण दुसर्याचे धृपद पटकन सापडते. कित्येक वेळेला आपल्याला जाणवते कि या माणसाला समजावणे अवघड आहे. हा एके ठिकाणी अडकून बसलाय. आता त्याच पद्धतीने आता आपले धृपद शोधून बघूया का ? कदाचित इतरांची मदत होईल आपल्याला, त्यांनी सांगायचा प्रयत्नही केला असेल आपल्याला, आठवून पाहूया का थोडस. 

मला दिसलेली काही धृपदे अशी होती. ‘माझ कोणतहि काम सरळ होत नाही. नेहमी अडचणी येणारच’ ‘आमच्या घरात वडलांनी कोणाला मनाप्रमाणे निर्णय घेऊ दिलेला नाही.’ ‘मेरीट ची कदरच होत नाही, पुढे पुढे करणार्यांचच जग आहे.’ ‘आपल्या लोकांना धंदा जमायचंच नाही.’’ हा माणूस असाच गोंधळ घालणार नेहमी आणि आमची गोची करणार ‘ माझा हा स्वभाव नाही, मला जमायचं नाही. हि आणि अशी अनेक वाक्ये आपल्याला सापडतील.

अशाच वाक्यांच्या आधाराने आपण आपल अपयश किंवा सध्याची स्थिती justify करत असतो. या वाक्याला आपण  अर्धविराम घेतो, मोठ्ठा श्वास घेतो आणि परत रिंगणात चालयाला लागतो. या रिंगणातून बाहेर पडायचं असेल तर या पालुपदांचा समाचार घेता यायला हवा. 

Albert Einstein म्हणतो We cannot solve our problems, with the same thinking we used, when we created them.”   पालुपद बदलल कि आपण वरच्या maturity level वर जातो आणि आपोआपच प्रश्न सुटून जातो.

Counselors  म्हणतात तुमचा self talk positive  करा म्हणजे प्रश्न सुटेल. पण बरेच वेळेला आपला हा self talk  आहे हेच आपल्या लक्ष्यात येत नाही. यासाठी एक irritating  मित्र शेजारी असावा लागतो. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात ना अगदी तसा ... म्हणजे अस का घडतंय माझ्या आयुष्यात; याच आपण जे कारण देतो, ते मान्य न करता, म्हणजे नेमक काय म्हणायचंय तुला? अस न कंटाळता विचारत, तुमच्याच मनात, एक एक पायरी उतरत खोल घेऊन जाणारा सखा हवा यासाठी. नसेल तर आपणच आपला सखा व्हायचं. 

Self talk च पालुपद हे सर्वाना पटणार आणि इतरांना निरुत्तर करणार एक कारण ( justification) असत. या युक्तिवादाने जग manage  झाल, मीही माझ्या अपयशाच्या ( साचलेपणाच्या ) guilt मधून बाहेर आलो, अस  समजून आपण तिथेच थांबलो तर मग वाढ खुंटते. 

माणूस हा logical प्राणी असल्याने विचारांच्या सुसंगतीत तो safety शोधतो. आपल्यासकट जगाची एक कल्पना मनात घेऊन त्या कल्पनेतील जगाला तर्कसंगत करत मार्गक्रमण करण्यात ज्ञात जगात एक प्रकारची security मिळते. हळूहळू आपल्या विचारांच्या खेळाकडे त्रयस्थपणे पाहता आल आणि आपल्याच विचारांची शृंखला (loop) तोडता आली तर मोकळ्या आभाळात विहरता येईल.

Ekhart Tolle म्हणतो To awaken means to awaken out of the self talk in the head, because self talk Is a form of hypnosis- self hypnosis.”