जगात असच वागाव लागत अस
आपण लहान पणापासून ऐकत आलो आहोत. वेगवेगळ्या काळात हे असच असत याबद्दलचे parameters बदलत गेले आहेत. हुंडा
द्यावाच लागतो, वधूपक्षाला पडत घ्यावाच लागत, admission साठी donation द्यावच लागत, हल्ली पैसे
दिल्याशिवाय कामच होत नाही, शासनात रहायचं तर त्यांच्यापैकी एक होऊन रहाव लागत, अशा
अनेक collective beliefs आपण समाज म्हणून बाळगत असतो.
अगदी कधीही सरकारी office ची पायरी न
चढलेली एखादी गृहिणी सुद्धा खात्रीने भ्रष्टाचाराबद्दल बोलते. सर्वच जण या समजुती
पडताळून न बघता सत्य म्हणून गृहीत धरून चालतात. कित्येक वेळेला त्या समजुती योग्य नसल्या
तरी त्यांना विरोध करणे सोयीचे नसल्यामुळे त्यांना बहुतेक जण succumb होतात आणि सहज
सोप्या रस्त्यावर मार्गक्रमण करतात.
अशीच एक मोठ्ठी belief यापूर्वी प्रचलित होती ज्यात सर्व सामान्य माणस अडकली होती.
‘इतना तो black चालता ही है’ Demonatization
च्या झटक्याने त्या
सामन्यांच्या समजुतीला सुरुंग लावला. कायद्याला गृहीत धरण्याची वृत्ती तयार झालीय,
तिला काही प्रमाणात चाप लागला . पिंक सिनेमा ने drinks घेणारी मुलगी ही available असते या belief ला challenge केले. आम्ही कचर्यासंबंधी पुण्यात जो प्रयोग केला
तेंव्हा भारतीय माणूस indisciplined असतो ही belief
challenge केली. System व्यवस्थित असेल
तर लोक कचरा संकलनास नक्कीच शिस्तीने हातभार लावतील या विश्वासने आम्ही काम केल
आणि लोकांनीही हा विश्वास सार्थ ठरवला.
पण स्वच्छ भारत मिशन ने भारतीय
indisciplined आहेत ही धारणा पक्की केली. लोक ऐकत नाहीत त्यांना शिकवलं
पाहिजे अश्या समजुतीने सगळे एकमेकांना 'लोक' म्हणू लागले आणि guilt देऊ लागले. या समजुतीच्या
एका छोट्या चुकीसाठी आपण खूप पैसे प्रबोधनावर खर्च करू अशी मला भीती वाटते
जेंव्हा मोठी सुधारणा
करणे अपेक्षित असते तेंव्हा समाजात रुजलेल्या या collective beliefs ना challenge करणे गरजेचे असते
अन्यथा आपण कडेकडेने जात incremental
improvements साधू शकतो. बदल समाज
स्वीकारणार नाही या भीतीनेही बरेचसे leaders
असलेल्या श्रद्धा जोपासत
पुढे जाऊ पाहतात.
चुकीच्या समजुती challenge करण्याचे धैर्य
ज्यांनी दाखवले त्यांनी इतिहास घडवला. नंगेसे खुदा डरता है ही म्हण positively घेतली तर कित्येक
वेळेला या समाजाच्या बागुलबुवा ला आपण हादरवून सोडू शकतो.बहुतेक आपल्या
लक्षातच येत नाही कि इतिहास घडवणारी माणस तुमच्या आमच्यासारखी सामान्याच होती. पण
त्या काळात समाजात रुजलेला एखादा फंडा challenge केल्याने ती मोठी
झाली.
जिजाबाईला शिवाजी ची आई
म्हणून न पाहता त्यावेळच्या अनेक सरदारांपैकी एका सरदाराची बायको म्हणून पहा. इतर
सरदाराच्या बायकांची नावेही आपल्याला माहित नाहीत. पण या सरदारीण बाईने
आजूबाजूच्या परिस्थितीत चालू असलेला अन्याय पहिला आणि त्यासाठी पेटून उठली आणि
अतिशय मुत्सद्दीपणाने समाजाच्या परकीयांना शरण जाण्याच्या मानसिकतेवर आपल्या
एकुलत्या एक पुत्राच्या माध्यमातून हल्ला चढवला. 'काय करणार, परकीयांची चाकरी
केल्याशिवाय काही गत नाही' ही belief तिने challenge
केली आपण त्यानंतर चा इतिहास जाणताच.
त्यामुळे जगात असच वागाव
लागत, असच असत, अस करावाच लागत, हे असच चालायचं ही वाक्य मोठी घातक असतात. ही
समाजाला नपुंसक बनवतात. त्यामुळे कधीही अशी वाक्य ऐकलीत कि सावध व्हा, आणि शक्य
झाल्यास इतरांना सावध करा. या गृहितकांना आपण निदान चर्चेत आव्हान द्यायला लागलो
तरी अनेक अनावश्यक गोष्टीना आपण पायबंद घालू शकू अस मला वाटत.