Friday, April 13, 2018

Identity चे फेरे, तत्वाची खुंटी


आपला स्वभाव, त्यानुसार लोकांनी आपल्यावर मारलेले आणि आपण मनापासून स्वीकारलेले शिक्के आपण इतके सिरीयसली घेतो कि आपल्याला मिळालेले एकुलते एक जीवन जगताना, त्या परीघाबाहेर जाणे ही तत्वांशी तडजोड आहे असे आपल्याला वाटते. खरतर आपण तयार केलेल्या या कृत्रिम परीघाबाहेर अनेक लोक सहज वावरत असतात. वयाबरोबर आपणमात्र या सीमारेषा गिरवून गिरवून आणिकच गडद करत नेतो आणि स्वतःला स्वतःच तयार केलेल्या पिंज-यात सिमीत करत जातो अस मला वाटलं. माझं वागणं सडेतोड असतं, मी फार हळवी आहे, मला कोणी challenge केलं की मी चवताळून उठतो, मला माझं स्वातंत्र्य फार महत्वाचं आहे. अशी आपापली आवर्तने गिरवत रहातो.

माणूस आपल्या मेंदूची नगण्य क्षमता आपण वापरतो असे म्हटले जाते, त्याचे एक महत्वाचे कारण non-exploring the possibilities which logically don’t suit my personality / identity आहे असे मला वाटते  Once we identify with a way of living, sometimes it is a kind of ism, we start belittling other ways of living. In this way, we console to ourselves, that we are right and should continue in our own comfort zone.

अनुभव हा गुरू असतो हे अगदी लहानपणापासून माहीत असूनही, आपण धक्क्यातून सावरत सावरत, स्वतःला प्रश्न विचारत, एक आवर्तन पूर्ण करुन पुन्हा मूळ ठिकाणीच विसाव्याला येणार असू तर life will simply repeat itself. जगात वावरताना आपल्याला अनुभवांचे धक्के बसतात. आपली जीवनविषयक भूमिका साफ चुकीची ठरण्याचे प्रसंग येतात. पण ब-याचवेळा साधक बाधक विचार करतोय अशा  भ्रमात राहून  फिरुन मूळ समजूतीपर्यंत येऊन पोहोचतो. याचं कारण त्या समजूतीत दम असतो म्हणूनच फक्त नाही, तर तिच्यावर आपलं मीपण अवलंबून असतं म्हणून.

वेगळं वागल्याने काही आभाळ कोसळणार नसते. गंभीर लोकांनी बेफिकीर होऊन जगणंनी casual मंडळींनी sincerity दाखवणे शक्य आहे. पण आपल्या पद्धतीने जगण्याला आपण इतके justification चे लेप लावतो कि त्या लेपाचा पोपडा जड झाला, कडक झाला तरी त्याला स्वतःचा चेहरा असल्यासारखा अत्यंत सहजपणे आयुष्यभर वागवतो.
   
वेडात मराठे वीर दौडले सात प्रसंगातील शूरसेनापती प्रतापराव गुजर यांनी तत्वाच्या अति आग्रहापायी जीव तर गमावलाच पण शिवाजी महाराजांनीही एक सच्चा साथी गमावला. Why do we always over emphasize our virtues even when it is disproportional to the situation.  जगानी मला चांगलं म्हणाव म्हणून ? का तत्व सिद्ध करण्याची आपली जबाबदारी आहे अशी समजूत असते म्हणून ? काही भूमिका काही तत्वांना आपण चिकटून बसतो ती आपली identity  होतात. आणि मग आपला तुझे आहे तुजपाशी मधला आचार्य होऊन जातो, लोकांनी माझा उदोउदो केला आणि मीही त्यामुळे त्या रस्त्यावर चालत गेलो असे म्हणणाऱ्या आचार्यांचे नाटकाच्या शेवटी येणारे वक्तव्य आपल्याला अस्वस्थ करून जाते.

अरुणिमा सिन्हा यांच्यावरच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मी हजर होते. जगातले सात  उंच पर्वत चढण्याचा मानस त्या शूर मुलीनी या कार्यक्रमात व्यक्त केला. पण माझ्या मनात क्षणभर चर्र झालं. आपलं जीवन कोणाला काय सिद्ध करून दाखवण्यासाठी व्यतीत करतोय का? अशी शंका आली. तिने आधीच इतक उच्च धाडस दाखवलय कि आपण अचंबित होऊन जातो. त्या मुलीच्या आयुष्यात इतर नाजूक भावना अंकुरणारच नाहीत का? तिने एक भीष्मप्रतिज्ञा केल्यामुळे मला तिची व्यक्तीशः फार काळजी वाटली. मी चुकीचीही असेन कदाचित...

आयुष्यात ध्येय हे फार महत्वाचे असते असे success literature बिम्बवते, आणि live the life as it comes असे अध्यात्मिक विचारात सुचवले जाते. स्वतःची ठाम समजूत करून घेऊन एकाच प्रकारचे आयुष्य जगताना आपण अनेक इतर शक्यतांना नाकारत असतो याचे भान असते का आपल्याला? आयुष्य हे व्यामिश्र आहे आपण त्याला आहे तसं कवेत न घेता, तत्वांच्या परिघावरच चालत रहाणार का?

 माझ्याकडे याचे उत्तर नाही, पण प्रश्न जरूर पडलाय.





Monday, April 2, 2018

‘Acceptance’ नाईलाजाने का प्रेमाने


To get out of grief, depression, irritation, one needs to accept the reality असं नेहमी म्हटलं जात. पण म्हणजे नेमकं काय accept करायचं? दुख: देणारी व्यक्ती वाईट आहे आणि तिच्या नादाला न लागणे बरे, हे accept करायचं? का जगात न्याय असतोच अस नाही, हे accept करायचं? का हे सगळ सहन केलं पाहिजे, हे accept करायचं? हे माझ्याच वाट्याला का येत हा प्रश्न विचारायचा नाही, आहे तसं accept  करायचं? नेमकं काय accept करायचं याबाबत माझ्या मनात खुप गोंधळ असायचा. एकीकडे self- help literature हे स्वतःच्या परिस्थितीची जबाबदारी घ्यावी असे सुचवते. प्रत्यक्षात मात्र दुख: झाले कि मात्र आपण दुसर्यांना, स्वतःला अथवा नशिबाला दोष देत आपण विचारांच्या गुंत्यात अडकतो आणि काय accept करायचे हे कळेनासे होते.

जगाच्या पसाऱ्यात मन न रमल्यामुळे दारूच्या नशेत झोकून दिलेल्या व्यक्तींसाठी Alcoholic Anonymous हि संस्था काम करते. त्यांची प्रार्थना फार अर्थगर्भ आहे. ती आपल्याला दिशादर्शक ठरेल.
"God, grant me the serenity to accept the things I cannot change,
Courage to change the things I can,
And wisdom to know the difference."

मला यातलं wisdom to know the difference’ हे फार महत्वाचे वाटते. आपण खूप वेळेला ज्या गोष्टी बदलणे आपल्या आवाक्यात नाही त्यावर जास्त डोकेफोड करतो. दुसऱ्या व्यक्तीला आपण बदलू शकत नाही हे सत्य जाणून न घेता, त्यांनी कस बदलाल पाहिजे यावर आपण चर्चा, प्रयत्न आणि आदळाआपट करण्यात कितीतरी वेळ व्यर्थ घालवत असतो. God, give me grace to accept with serenity.

Accepting hardship as a pathway to peace,
Taking, as Jesus did,
This sinful world as it is,
Not as I would have it,
Trusting that You will make all things right,
If I surrender to Your will,

संत महात्म्यांनी हेच सांगितलय, you are not in control. इतर लोक असेच वागणार असं समजण्याऐवजी तेही बदलतील, पण त्यांच्या गतीने. अन कदाचित आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीने नाही बदलणार हे समजून घ्यायला हवे. प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या permutation/ combination प्रमाणे असलेल समीकरण एकत्रित रित्या जगात कस workout होईल(घटनांच jig-saw puzzle) याबद्दल निसर्गाची काही गती असते, ‘God’s timing we can say. जगात सगळ माझ्या मताप्रमाणे, माझ्या मनाप्रमाणे होईल अस अजिबात नाही. काळाची एक गती आहे ती मला मान्य करावी लागेल. मी माझे प्रयत्न नक्की करेन पण मी प्रयत्न केले म्हणून फळ मिळालाच पाहिजे हा आग्रह धरणार नाही. एखादी व्यक्ती शक्य असूनही बदलत नाहीये असे दिसले तरी मी तिच्यावर आगपाखड करून, तिच्या बद्दल आकस धरून, किंवा तिच्याबाबत ग्रह करून घेऊन ती बदलणार असते अस नाही. मग निरंतर प्रेम करत राहून बदलाची अपेक्षा न ठेवता संवाद चालू ठेवायचा, बदल झाला तरी छान नाही झाला तरी छान अशा सहजतेच्या मानसिकतेतून जगायला शिकणे महत्वाचे आहे.

जगणे हा जगायला शिकण्याचा निरंतर प्रवास आहे. This will pass too हे दु:ख आणि सुखाबाबत खर आहे पण हेही तितकच खरं आहे कि the drama of life will continue – there is not happy ending or sad endings as is shown in movies and fairy tales. हे झाल्यावर मी सुखी होईन किंवा मी एवढे कमावले कि सगळ आलबेल होईल या भ्रामक कल्पना आहेत. त्यामुळे आपण आयुष्याकडे टप्प्या टप्प्याने कालक्रमण करतो, शैक्षणिक यश, नोकरी लग्न, मुलांचे यश इ. हा सगळा लौकिक प्रवास करताना या प्रवासातली यशापयश आपला अध्यात्माचा पाया भक्कम करू शकतात.

दोन महत्वाच्या गोष्टी स्वीकारणे गरजेचे असते. एक म्हणजे भूतकाळ आणि ज्या परिस्थितीत आपण आहोत ती परिस्थिती. त्याचबरोबर बदलाच्या शक्यतांवर आपला असलेला अल्प प्रभाव आपण मान्य केला पाहिजे. जे घडल आहे तो भूतकाळ आपल्याला आहे तसाच स्वीकारावा लागतो. त्याला का प्रश्न विचारून काय उपयोग? तसेच जे आपल्याला मिळालाय शरीर, स्वास्थ्य, इतर वारसात मिळालेल्या गोष्टी याही प्रश्न विचारून बदलणाऱ्या नाहीत. एखादा विचित्र प्रसंग घडून गेला कि का हा प्रश्न आपल्याला खूप काल सतावत राहतो. या का ला आपण जितकी लवकर सोडचिठ्ठी देऊ तितका आपला प्रवास सोपा होईल. आता हि गोष्ट  घडली आहे तर आपल्या मनात सदभाव कायम ठेऊन आपण काय करू शकतो, हे पहाण्यात शहाणपण आहे. In the given circumstances, what next याचा तातडीने विचार सुरु होणे गरजेचे असते. त्यासाठी आपले आपल्या मनातल्या विचारांवर लक्ष्य असणे गरजेचे आहे.

यात दुनियादारी आणि जीवनाची नैसर्गिक तत्वे यातील फरक लक्षात घेऊन नैसर्गिक तत्वे विश्वासाने जगणे आवश्यक असते. आपल्या योग्य विचारांना दुनियादारीचे प्रश्न न विचारणे आवश्यक असते. दुनियादारी हि बरेचदा स्वार्थाकडे नेणारी, स्पर्धा, बरोबरी अश्या दुय्यम विचारांना खतपाणी घालणारी असते. त्याविरुद्ध नैसर्गिक किंवा वैश्विक तत्वे हि प्रामाणिकपणा, विश्वास, सबुरी, वाढ, माणुसकी, विश्वबंधुत्व यावर उभारलेली असतात.

या मोठ्या संकल्पना जरी बाजूला ठेवल्या तरीही आपण जर हे मान्य केले कि -
·         इतरांप्रमाणे मीही चुकू शकतो
·         Accept that you are not perfect
·         माझे लोक हि माणसे असल्याने तेही चुकू शकतात
·         तुम्ही जसे स्वतःला पाहता, तसे इतरांना माहिती नसता, त्यामुळे ते तुमच्या सदीच्छा बद्द्दल साशंक असू शकतात
·         दुसरी व्यक्ती पूर्णपणे वेगळ्या मुशीतून घडलेली असते, त्यामुळे तिच्या बाबतीतले तुमचे अंदाज चुकू शकतात
·         ती तुमच्या अपेक्षांप्रमाणे वागली नाही म्हणजे ती दुष्ट, नालायक किंवा खलनायक होत नाही
·         ती व्यक्ती आत्ता बदलली नाही म्हणजे कधीच बदलणार नाही असे नाही, पण तुमच्या अपेक्षे प्रमाणे बदलेलच असे नाही
·         Accept that you may have been wrong and others’ story of the same incidence, may be as true as     yours
·         Accept the rules of nature and life would prevail

·         जी घटना घडली ती घडायला नको होती असे वाटून ती पुन्हा उलटी फिरू शकत नाही मात्र त्यातून योग्य मार्ग नक्की काढता येतो.  दुसर्याला दोष देणे किंवा नशिबाला बोल लावल्याने काहीही साध्य हित नाही, दुखच्या गर्तेत आपण वेगानी जातो

Accept the soul of others, which is very kind and you have seen the glimpses of it, at times, instead of his behaviour which is complicated by his and your belief patterns  
Resistance to acceptance is the journey. We resist what ‘is’ and desire for what it should be, which leads us nowhere.   What needs to be changed should be changed with dispassionate clarity and not with the emotional baggage of resistance.

Accept with your heart and feel it with love and compassion. Love them and feel sorry for the hurt incurred by you instead of superficially apologizing. With right thoughts you may create acceptance at conscious level but slowly we have to start believing in it which takes us to the subconscious level, with a nice feeling .. which makes acceptance more enduring. Acceptance is quite softer, it cleanses, creates space for fresh air to oxygenate life. We need to make peace with ourselves. 

Whatever the present moment contains, accept it as if you had chosen it.”
Eckhart Tolle
Things end, people change and you know what, Life goes on.